॥ श्री ॥

श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) येथे संपन्न झालेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवाचा वृत्तांत


भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवाचा मुख्य सोहळा ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) या प्रकल्पस्थानी प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादांच्या आणि प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या परममंगल उपस्थितीत प्रतिवर्षी संपन्न होत असतो. या वर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध ४ श्रीशके १९४७, मंगळवार व बुधवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२५ असे दोन दिवस प्रकल्पस्थानी आनंदमय व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवासाठी पुणे, मुंबई, कऱ्हाड, नागपूर, भिलाई, कोल्हापूर, आंबेरी, अकोला, अमरावती, गोवा अशा मंडळाच्या विविध केंद्रांतून अनेक साधक-सज्जन आवर्जून उपस्थित होते.

महोत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच मंदिराचा संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता. सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता प.पू.सद्‌गुरु श्री.दादांचे प्रकल्पस्थानी शुभागमन झाले. प्रकल्पस्थानी आल्यावर प्रथम प.पू.सद्‌गुरु श्री.दादांनी प्रेमभराने श्रीभगवंतांचे दर्शन घेतले. प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे सुद्धा याच रात्री साडेअकरा वाजता प्रकल्पस्थानी शुभागमन झाले.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.